सातारा जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे तुम्ही कोणाच्या नावाची मागणी करणार असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, आता कोणाची मागणी करु कोणाचे नाव घ्यायचे सगळे जवळचे आहेत . सगळेच मित्र मंडळी आहेत. नंतर हसत हसत उदयन राजे म्हणाले , नाही तर चिठ्ठ्याचं टाकुयात असे उदयनराजे जलमंदिर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले
,मला काय वाटते काय विचारता? माझं मला पडले आहे. त्यानंतर हसत हसत ते म्हणाले, रामदास आठवले म्हणतात ते बरोबर आहे . त्यांचे होत नाही तोपर्यंत मलाच करा ना ! तुमचे आधी काय ते ठरवा . काय तो निर्णय घ्या . अशी मिश्किल प्रतिक्रिया ही उदयनराजे यांनी यावेळी दिली