दिवड परिसरात शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यंदा परतीच्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. आपल्या भागाला देखील याचा तडाखा बसला आहे. कांदा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतेच सरकारने पीक नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. माण- खटावमधील झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईसाठी मी प्रयत्न करणार. असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले असून माझ्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार आहे.
माण आणि खटाव तालुक्यातील शेती नुकसानीचे सरसकट पंचनामे करा आशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
माण आणि खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवायचे बंद करुन दोन्ही तालुक्यात सरसकट पंचनामे करावेत अशा सुचना दिल्या. महत्वाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही प्रांतांना दिल्या. दुचाकीवर तसेच चिखलातून चालत मार्ग काढत त्यांनी शेतीपिकांच्या नुकसानीची पहाणी यावेळी केली.
दहीवडीतील विह्रामगृहावर आयोजित बैठकीला प्रांत अश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. जीवापाड परिश्रम करुन जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.
कृषी आणि महसूल विभगाच्या अधिकाऱ्यांनी आता वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत.
पंचनामा करणाऱ्या एजन्सीज व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यांचा मेळही बसणार नाही. सर्व ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश द्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि तहसिलदारांनी द्यावेत. या कामी दोन्ही अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे अशा सुचनाही दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी तर मोबाईल फोटोवरुनही शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना चालढकल केली तर गाठ माझ्याशी आहे.