पंतप्रधानांच्या हस्ते किसान समृद्धी केंद्राचे उदघाट्न होणार

107
Adv

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार असून याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे, या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील किसान समृद्धी केंद्राची यादी तयार करून ती सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे कामं कार्यकर्ते करत आहेत, अशी माहिती भा ज पा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली

शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते.पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्या साठी सुरू करण्यात येत आहे.एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे.सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे.असे भा ज पा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी सांगितले

पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची उद्दिष्टे  ठरवण्यात आली आहेत त्या मध्ये,शेतक-यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणे. शेतक-यांना माती, बियाणे, आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे. किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे. त्या केंद्रांशी शेतक-यांना जोडून देणे. शेतक-यांना लागणा-या अन्य सेवा विक्री पध्दतीने किंवा कस्टम हायरींग सेंटर द्वारे उपलब्ध करून देणे. शेतक-यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे. खते, औषधे, किटक नाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे यांचा समावेश आहे असे धैर्यशीलदादा कदम यांनी सांगितले

     देश भरात जिल्हा, तालुका आणि खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी 2.8 लाख दुकाने आहेत. या खत विक्री दुकानांचे किसान सुविधा केंद्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने रूपांतर करण्यात येणार आहे.
     सर्व किसान समृध्दी केंद्राबाहेर फ्लेक्स  साईन बोर्ड किंवा ग्लो साईन बोर्ड लावला जावा. या साईन बोर्डचे डिझाईन एकाच पध्दतीने केले असावे.हे बोर्ड दुकानाच्या दर्शनी भागावर दिसतील अशा पध्दतीने लावण्यात यावे.या बोर्डचे फ्रंटेज डिझाईन देशभर सारखेच असले पाहिजे. स्थानिक भाषेनुसार विक्रेत्याचे नाव व अन्य गोष्टी वेगळ्या स्वरूपात असू शकतील. विक्रेत्याचे नांव, पत्ता, जीएटी नंबर ही सर्व माहिती त्या फलकावर पटकन दिसेल अशा पध्दतीने डिझाईन केलेली असावी.शेतक-यांना पटकन वाचता येईल या पध्दतीने ही माहिती बोर्ड लिहीली जावी.
खेडेगाव पातळी,ब्लॉक पातळी,
जिल्हा पातळी या प्रमाणे पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत,वस्तू ठेवण्यासाठीचे रॅक,शेतकऱ्यांची बसण्याची व्यवस्था,पीओएस   मशीन, क्यूआर कोड / बार कोड / स्कॅनर, ठळक पध्दतीने वस्तुंची मांडणी,खत, बियाणे, औषधे यांच्या उपलब्ध साठ्याची माहिती देणारे बोर्ड, सबसिडी, एमआरपी याची माहिती, शेती विषयची पुस्तके व अन्य माहाती,लीफ  चार्ट, सॉईल फर्टीलिटी मॅप या केंद्रात उपलब्ध असणार आहे,
सरकारकडून आलेले संदेश / माहिती देणे या बाबत चे कामं सुद्धा या केंद्रातून केले जाणार आहे या केंद्रातून खेडेगाव पातळीवरील केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांखेरीज
स्मार्ट टिव्ही (इंटरनेट सुविधे सह),
हेल्प डेस्क,सुविधा केंद्रांशी जोडून देणारी व्यवस्था, माती परिक्षण सुविधा, बियाणे तपासणीसाठी नमुने गोळा करणे,
ड्रोन सारख्या सेवेसाठी कस्टम हायरींग फॅसिलिटी उपलब्ध करणे,ब्लॉक पातळीवरील केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांखेरीज उपलब्ध असणा-या सुविधा, खते,औषधे, औजारे यांच्यासाठी मोठ्या डिस्प्ले सुविधा.ज्यामुळे उत्पादनाविषयी शेतक-याला पूर्ण कल्पना येऊ शकेल असे ते म्हणाले

माती, बियाणे, पाणी, किटक नाशके यांच्या चाचणीची (टेस्टींग) व्यवस्था ​किंवा अन्य चाचणी केंद्रांची शेतक-यांना जोडून देण्याची व्यवस्था,  कॉमन सर्विस सेंटर,शेतीमध्ये करता येवू शकणा-या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती देणा-या फिल्म दाखविण्यासाठी व्यवस्था,तसेच शेतीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झालेले नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, शेतक-यांच्या यशोगाथा याची माहितीही फिल्मद्वारे या स्मार्ट टिव्हीतून शेतक-यांपर्यंत पोहचवता येईल. शेतक-यांना खताच्या वापराविषयी काही माहिती हवी असल्यास ही माहिती तज्ज्ञ  मंडळींकडून उपलब्ध करून देण्यासाठी ती यंत्रणाही स्मार्ट टिव्हीद्वारे सुरू करता येते. या सर्व सुविधा स्थानिक भाषेत उपलब्ध होऊ शकतात अशी माहिती भा ज पा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली

किसान समृद्धी केंद्राचा आतील भाग U/C/L पध्दतीने तयार करण्यात येणार आहे .त्यामुळे शेतक-यांना उपलब्ध वस्तुंची माहिती पटकन कळू शकेल. या केंद्रांमध्ये ATM ची व्यवस्था करण्यात येणार आहे .तसेच शक्य असल्यास सौर उर्जेचा वापर त्या ठिकाणी केलेला जाणार आहे,किसान समृद्धी केंद्रात सर्व पध्दतीची खते (सेंद्रीय, जैविक, नायट्रोजनयुक्त, फॉस्फॅटीक, पोटॅश, वॉटर सोल्युबल , मायक्रो न्यूट्रिअन्टस )असतील,या केंद्रातून विक्री होणा-या एकूण खतापैकी 20% खते पर्यायी खतांच्या स्वरूपातील असावी, अशी अपेक्षा आहे. किटक नाशके, औषधे, बियाणे तसेच स्प्रेयर सारख्या छोट्या छोट्या वस्तू या केंद्रातून विकल्या जाव्यात. पिकांवर खते आणि औषधांची ड्रोन मधून फवारणी करायची असेल तर त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतक-यांना संबंधीत यंत्रणेशी जोडून देण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध असणार आहे
किसान सुविधा केंद्रात माती तपासणीच्या सर्व सुविधा ब्लॉक, तालुका, प्रांत आणि जिल्हा पातळीवर या केंद्रांमधून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत

शेतक-यांनी कोणती पिके घ्यावीत, कोणत्या पध्दतीने घ्यावीत यासाठीचे मार्गदर्शन या केंद्रातून उपलब्ध करून दिले जाणार आहे,  केंद्रातील तसेच राज्यातील सरकारने शेतक-यांसाठी सुरू केलेल्या योजना, पुरविलेल्या सुविधा याची माहितीही या केंद्रातून शेतक-यांना दिली जाईल. शेतक-यांना माती परिक्षणानुसार कोणती खते वापरावीत, किती पाणी वापरावे, कोणती पीके घ्यावीत याचेही मार्गदर्शन या केंद्रांमधून केले जाईल. विशिष्ट पध्दतीने पीक घेतल्यास त्यातून चांगले उत्पन्न कसे मिळते याबाबतच्या शेतक-यांच्या यशोगाथांची माहिती या केंद्रात उपलब्ध असेल. कोणत्या बाजारपेठेत कोणत्या मालाल काय भाव आहे, पीक विमा योजना, हवामानाची माहिती, ड्रोन वापराची माहिती अशी वेगवेगळी माहिती या केंद्रातून शेतक-यांना दिली जाईल. तसेच ड्रोन वापराचे प्रशिक्षण कसे मिळेल याची माहितीही त्या केंद्रात मिळू शकेल.किसान सुविधा केंद्राच्या परिसरातील शेतक-यांना परस्परांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ​किसान की बातच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. या चर्चा आणि गप्पातून शेतक-यांना अनेक गोष्टींविषयीचे मार्गदर्शन सहजरित्या उपलब्ध होईल. महिन्यातून एकदा किंवा दोनदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या चर्चा, गप्पा कार्यक्रमासाठी केंद्रीय खत मंत्रालयाकडून संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर उपलब्ध केले जाईल.

संबंधीत खत कंपन्यांकडून विक्रेत्यांसाठी दर सहा महिन्याला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. शेती क्षेत्राशी संबंधीत वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, कृषी संशोधक, वैज्ञानिक यांच्याकडून विक्रेत्यांना मार्गदर्शन केले जाईल. खताचा योग्य प्रमाणात वापर कसा व्हावा, पिकाच्या वाढीमध्ये कोणते पौष्टीक घटक आवश्यक असतात, पिकावर रोग पडल्याची लक्षणे, माती परिक्षणानुसार खत वापराचे नियोजन, सेंद्रीय खतांचा वापर आणि फायदा, जैविक खतांचे फायदे, नॅनो फर्टीलाईझर याबाबतची माहिती वैज्ञानिक, संशोधक आणि तज्ञांकडून विक्रेत्यांना दिली जाईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमातील माहिती खत कंपन्यांकडून खत मंत्रालयाला पाठविली जाईल. असेही भा ज पा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी सांगितले

खत विक्री, किटक नाशके, औषधे बी-बियाणे विक्री यासाठी ज्या विक्रेत्यांकडे आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या, जीएसटी क्रमांक असेल त्यांनाच या केंद्राचा परवाना दिला जाईल तसेच सुविधा केंद्राचा संचालक खत कपन्या, कृषी महाविद्यालये, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या संपर्कात असला पाहिजे.
सदरच्या विक्रेत्याने शेतक-यांशी व अन्य संबंधीतांशी त्वरेने संपर्क साधण्यासाठी आयटी तंत्रज्ञानाचा प्राधान्याने वापर केला पाहिजे. शेतक-यांचा वॉटस् अ‍ॅपवर किसान समृध्दी समुह या नावाने ग्रुप तयार करून त्याद्वारे शेतक-यांकडे वेगवेगळी माहिती तातडीने पोहचवण्याचे काम विक्रेत्याने केले पाहिजे.   या बरोबरच खत उत्पादक कंपन्यांनी या सुविध केंद्रांच्या दर्शनी भागावर शेतक-यांना पटकन दिसतील अशा पध्दतीचे दोन इंडिकेटर बोर्ड लावले पाहिजेत. त्या केंद्राच्या परिसरातील शेतक-यांच्या मातीचे नमुने गोळा करण्यासाठी आणि त्याची तपासणी करण्यासाठीची मोबाईल सॉईल  टेस्टिंग  व्हॅन (फिरते माती परिक्षण केंद्र) त्या विक्रेत्याने सुरू करणे अपेक्षीत आहे. जवळच्या सरकारी बियाणे परिक्षण प्रयोग शाळेतून बी-बियाणांची जलद चाचणी करून देणे ही अपेक्षीत आहे.

सद्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रूपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आलेले आहे.उर्वरित 1.8 लाख खत विक्री दुकानांचे रूपांतर या वर्षा अखेरीस ​किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींना या कार्यक्रमासाठी आपल्या जवळच्या पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रावर येण्याचे आवाहन केले आहे

 

Adv