खंडाळा पंचायत समितीत विविध विभागाची आढावा बैठक पार पडली मात्र या विभागांमध्ये सर्वांना समान न्याय द्यायचं काम अध्यक्षांचे होते मात्र भाजपच्या काही स्वयंघोषित नेत्यांना स्वतःच्या लाईनीत बसवल्याने नक्की बैठक भाजपची होती का आढावा बैठक हे कळायला मार्ग नाही
आढावा बैठक घेऊन संबधीत प्रश्नांची सोडवणूक करणे हे पदाधिकाऱ्यांचे काम असते मात्र पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्याला कुठलाही पदाचा अधिकार नसताना आपण फक्त पक्षाचे सदस्य आहोत म्हणून पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या लाईन मध्ये बसणं हे कितपत योग्य त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिस्तप्रिय अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी या चमकोगीरांना आवर घालण्याची गरज आहे
जिल्हा परिषदेत यशवंत विचार जपणे फार गरजेचे असून भारतीय जनता पार्टी प्रवेश केला म्हणजे आपण राष्ट्रीय लेव्हलचे नेते झालो असेच काही जण समजायला लागलेले आहेत त्यामुळे शिस्तप्रिय असलेल्या भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सर्वांनाच शिस्त लावण्याची गरज आहे






