महायुती किमान 220 जागा जिंकून विजयी होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे महायुतीला 220 पेक्षाही जास्त जागा मिळू शकतात, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.