Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित,

महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित,

261
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

महायुतीच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित आहेत, असं सुद्धा रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले रामदास आठवले?
भोरमधील हत्या प्रकरणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, ”आपलं सरकार असूनही दलितांना असुरक्षितता वाटते. या सरकारला आपण इतकं भरभरून मतदान केलं, हे सरकार असूनही दलितांची अशी अवस्था होत असेल तर, हे योग्य नाही. मला वाटतं की, यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाऊ नये.”

ते म्हणाले की, ”आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. दलितांना न्याय मिळणार आहे की, नाही? या सरकारमध्ये आम्ही आहोत, या सरकारमध्ये दलितांवर अन्याय होत असेल, तर ही गोष्ट बरोबर नाही.”

Adv