देशाची राजधानी नवी दिल्लीपासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये सध्या प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
सततचा खोकला, सर्दी आणि डोळे चुरचुरणे अशा समस्यांना समोरं जाव लागतंय. प्रदूषित हवेमुळे लोकांचे जगणं कठीण झाले असून त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहे. दिल्लीमध्ये मास्क घातल्याशिवाय बाहेर फिरणं अवघड झाले आहे. अशातच तुम्हालाच तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील तर दररोज नियमित उपाय करणं गरजेचे आहे. हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होऊ लागतात आणि डोळ्यांचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.