शेतकरी सभासदांच्या तळतळाटाचा जाब विचारण्याची वेळ आली आहे खा उदयनराजे

315
Adv

सातारा जिल्हा बॅकेकडे सभासद शेतकऱ्यांची परिपूर्ण यादी असतानाही बँकेने गटविम्याचा प्रिमियम कंपनीला भरलेला नाही .योजनेच्या घोषणा करून त्याची कार्यवाही करायची नाही हा कोणता यशवंत विचार आहे पाताळयंत्री व्यक्तीच्या अकार्यक्षमतेने सभासदांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे . शेतकरी खातेदारांच्या तळतळाटा चा जाब विचारायची वेळ आली आहे असा घणाघाती हल्लाबोल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे .

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की शेतकरी वैद्यकीय विमा योजना बँकेने जुलै 2021 पासून लागू करण्याचे जाहीर करताना सोसायटीची थकबाकी नसावी ही अट घालण्यात आली .शेतकरी सभासदांनी उधार उसनवार गहाणवट करून थकबाकी भरली .सोसायटी सचिवांनी अथक परिश्रमाने शेतकरी सभासदांची माहिती कळवूनही कपाळकरंट्या संचालकांनी त्यांचा गटविम्याचा प्रिमियम भरलाच नाही . या संचालकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . या योजनेचा बॅकेने मोठा गाजावाजा केला . शेतकन्यांचा प्रिमियम बँकेने स्वनिधीतून भरण्याचे जाहीर केले होते .31 जुलै 2021 पर्यंत सोसायटीचे कोणतेही कर्ज नसावे या निकषात पात्र असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एका सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाची हमी बॅकेने घेतली . या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2,53,000 व त्यांच्यावर अवलंबून असणारी एक व्यक्ती अशा पाच लाख जणांची यादी बॅकेला मुदतीत सादर करण्यात आली . मात्र तरीही वैद्यकीय प्रिमियम बॅकेने भरलाच नाही .

बॅकेने असा धरसोडीचा कारभार करून यशवंत विचारांना तिलांजली दिली आहे . योजनेची घोषणा करून कार्यवाही शून्य करायची हे कसले आलेत यशवंत विचार , पाताळयंत्री व्यक्ती च्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे जे काही आहे ते इथेच फेडायचे आहे ,हे पाप कुठे फेडणार आहात असा सणसणीत सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे .सभासदांच्या तळतळाटा चा जाब विचारण्याची वेळ आली आहे या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे .

Adv