Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचे वर्चस्व वाढले

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचे वर्चस्व वाढले

916
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक जिंकून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त केला याच बालेकिल्ल्यात आता तब्बल4 कॅबिनेट मंत्री 2 उपमुख्यमंत्री व 2 महामंडळ अशी तगडी खाती मिळाल्याने बालेकिल्ला अजूनच मजबूत झाला आहे

1999 पासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख होती ज्यांचा मागे सातारा जिल्ह्यातील आमदार हे ठाम पणे उभे राहिले त्यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने जिल्ह्यात प्रथमच भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले व बालेकिल्लाला सुरुंग लागला

लोकसभा निवडणुकीत लागलेला सुरुंग विधानसभेतही बालेकिल्ला म्हणणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष उध्वस्त करून पुन्हा सिद्ध झाला याचे सर्व श्रेय जाते ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना

चार कॅबिनेट मंत्री दोन उपमुख्यमंत्री दोन महामंडळ अशी तगडी खाती मिळाल्याने मंत्रिमंडळावर राजधानी साताऱ्याचे वर्चस्व हे सिद्ध झाले आहे पवार साहेबांनी 1999 पासून आज पर्यंत जिल्ह्याला झुलवले मात्र छत्रपती उदयनराजे यांनी फुलवले अशीच चर्चा मंत्रिमंडळ विस्तार नंतर रंगली

मात्र खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी लोकसभेत कमळ फुलवून राज्याच्या मंत्रिमंडळावर आपला ठसा उमटवला आहे
मंत्रिमंडळ विस्तारात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील जयकुमार गोरे शंभूराज देसाई यांनी शपथ घेतल्याने जिल्ह्याचे वजन राज्यात वाढले आहे

Adv