Saturday, June 6, 2026
spot_img
Home Satara District कास भरले सातारकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला यशोधन नारकर

कास भरले सातारकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला यशोधन नारकर

246
Adv

सातारकरांना वरदान ठरलेला कास तलाव पूर्ण भरल्याने सातारकरांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटला असल्याचे पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी सांगितले

सातारा शहराचे ऐतिहासिक कास तलाव दोन दिवसाच्या सतत पडलेल्या पावसाने भरला असून सातारकरांची वर्षभराची पाण्याची काळजी आता मिटली आहे कास तलाव परिसरात पावसाची संततधार सुरू असून कास तलाव भरुन वाहू लागला आहे कास तलाव भरल्याने सातारकर नागरिक आनंदी झाले असून सुरु असलेल्या कास तलाव उंचीच्या कामामुळे नक्कीच पाणीपातळीत वाढ झाली आहे त्यामुळे वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली गेली असेच म्हणावे लागेल

कास तलाव भरल्याने सातारकरांची पाण्याची चिंता मिटली असून कास तलाव ओसंडून वाहत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कास तलाव हा लवकर पावसाच्या भरला गेला

Adv