बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची कुवत उपनगराध्यक्ष शेंडे यांची अशोक मोने यांच्यावर टीका

356
Adv

नगरसेवक अशोक मोने यांनी नगराध्यक्षा व वसंत लेवे यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले आहे आणि अप्रत्यक्षरित्या सातारा विकास आघाडीचे देखिल अभिनंदन केले आहे. निश्चितच अनेक वर्षापासून फक्त कल्पनेत असणा-या योजना वास्तवात आणण्याचे काम सातारा विकासआघाडीने केले असून कासधरण कासची बंदीस्त पाईपलाईन घनकचरा व्यवस्थापन,भुयारी गटर योजना ग्रेडसेपरेटर नवीन प्रशासकीय इमारत,पंतप्रधान आवास योजना, बागांचे नुतनीकरण,शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण शाहुकला मंदिरनुतनीकरण,हद्दवाढ,मेडिकल कॉलेज,शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजना अशी त्यांच्या दृष्टीने स्वप्नवत वाटणारी विकास कामे सातारा विकास आघाडीने वास्तवात साकारुन, लोकार्पण केलेली आहेत. नागरीक ही विकास कामे उपभोगत आहेत. त्याचे सर्व श्रेय साता-यांतील सर्वसामान्य जनतेला म्हणजेच लोकशाहीतील राजांना जाते.त्यामुळे सातारा विकास आघाडी, नगराध्यक्ष व वसंत लेवे हे अभिनंदनास पात्रच आहे अशोक मोने यांनी केलेल्या अभिनंदनाबाबत त्यांना धन्यवाद देतो अशी प्रतिक्रीया सातारा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, नवीन प्रशासकीय इमारतीची जागा कोणतेही मुल्य अदा न करता, मोफतरित्या, कोटयावधीची मिळकत नगरपरिषदेच्या नांये करुन सातारा विकास आघाडीने नगरपरिषदेच्या खजिन्याची धनलक्ष्मी विविध उपक्रमांनी बाढवली आहे. त्याचा उपयोग सातारकर जनतेसाठी होणार आहे याची नोंद बेताल वक्तव्य करणा-या नगरसेवक अशोक मोने यांनी घ्यावी. आपली निष्क्रीयता लपवण्यासाठी उगाच बुध्दीभेद करुन, लोकांमध्ये गैरसमज पसरवु नये. भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावे दया शहानिशा करु असे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे ते रास्त आहे. सातारा नगरपरिषद ही या शहराची मातृसंस्था आहे नगरसेवक हे विश्वस्त आहेत जर कोणत्याही आघाडीचा नगरसेवक पुराव्याशिवाय आरोप करीत असेल आणि नगरपरिषदेची नाहक बदनामी होत असेल तर त्याचा समाचार नगराध्यक्षांनी घेतला ते योग्यच आहे.

सातारा विकास आघाडीने आजपर्यंत लोकहिताला प्राधान्य देत नेहमीच सकारात्मक आणि सर्वांना बरोबर घेवून समाजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचाराबाबत सातारा विकास आघाडीचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेहमीच विविध पातळीवर म्हणजेच गांव,शहर,तालुका,जिल्हा, राज्य,देश पातळीवर आवाज उठवलेला आहे. त्यांनी भ्रष्टाचार कधीही खपवून घेतलेला नाही. भ्रष्टाचाराचे संस्कारातच
तुम्ही बावरल्याने, तुम्हाला त्याच शब्दांचा आधार घ्यावा लागतो हे स्पष्ट होते आमचे भ्रष्टाचारमुक्त धोरण असल्यामुळेच ख श्री छ उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारकरांची जास्तीत जास्त सेवासुविधा देवून जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अश्या स्वरुपाचे बेलगाम बेताल विपर्यस्त बक्तव्य कोणी करु नये. केल्यास त्यास त्याच भाषेत उत्तर देण्याची कुवत साविआमध्ये आहे याची अशोक मोने यांनी नोंद घ्यावी असेही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शेवटी नमुद केले आहे

Adv