रयतेचा राजा मंत्रीपदी हवा. माजी शिक्षण सभापती सुनील काटकर

693
Adv

श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या नावाच गारूड महाराष्ट्रातील तरूणाईच्या मनावर आहे. उदयनराजे यांचा चाणाक्षपणा, राजकीय अभ्यास, अस्सल सातारी रोख-ठोक स्वभाव अणि बेधडकपणा याचे तरूणांबरोबरच सामान्य नागरिकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या विषयी काहीजणांना आदरयुक्त भीती आहे तर काहीजणांना अकारण भीती वाटते. परंतु काहीही असले तरी वरील दोन्ही विचारांचे लोक अंतिमत: महाराजसाहेबांचा शब्द प्रमाण मानतात. असे अलौकिक व्यक्तिमत्त्व ‘‘उदयनराजे’’ या नावात सामावलेले आहे.

प्रौढप्रतापी युगपुरूष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचा थेट वारसा लाभलेले उदयनराजे दिसायला चेहऱ्यावर राकट व करारी बाण्याचे असले तरी मनाने मात्र, कमालीचे हळवे आहेत, हे त्यांच्या सानिध्यात असलेल्यां व्यतिरीक्त फार कमी लोकांना माहित आहे. सर्व सामान्य लोकांना होणारा त्रास ते पाहू शकत नाहीत. सामान्य लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीला महाराजसाहेबांनी नेहमीच पहिले प्राधान्य दिले आहे. प्रश्नांची सोडवणूक करतांना प्रसंगी त्यांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकांच्या प्रश्नात आडव्या येणाऱ्या अपप्रवृत्तींना महाराज आपल्या स्टाईलने उत्तर देतात. प्रश्न समोर आल्यानंतर त्याची सोडवणूक होईपर्यंत ते गप्प बसत नाहीत. हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकही जाणतो. गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेताना हा माणूस कमालीचा हळवा होतो. डोळे भरून आलेला त्यांचा चेहरा अनेकांनी ह्दयसिंहासनावर जपून ठेवला आहे. जनतेच्या सुखदु:खाशी एकरूप होताना व्यक्तिगत अडचणींचे त्यांनी कधीच भांडवल केले नाही. उलट लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तन, मन व धन अर्पण करण्यास त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अपरंपार माया आहे. हा राजा जनतेशी एकरूप असल्यानेच राजकारणातील धुरंधर नेत्यांना जलमंदिर कायमच आपलेसे वाटत आले आहे. येथे भेट देणाऱ्या राजकीय क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हे त्याचे उदाहरण असते. तोच विश्‍वास येथे येणाऱ्या गोरगरीब, वंचित आणि सामान्य जनतेच्या चेहऱ्यावरही दिसतो. म्हणून जलमंदिरवर येणाऱ्या बलाढ्य आणि धनाढ्यांच्या अगोदर गोरगरीबांना प्राधान्य मिळते.

उदयनराजेंचे व्यक्तिमत्त्वच राजबिंडे असले तरी त्यात राजेपणाचा उन्माद कधीच दिसणार नाही. स्वत: राजे असूनही सर्वांना सर्वकाही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. स्वत:च्या अंगावर गुंजभर सोनं न घालणारा हा राजा म्हणूनच जनतेचा लाडका आहे. तरी त्याला दरडावून जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी ते आकस ठेवत नाहीत. म्हणूनच काही कारणाने विरोधात गेलेल्याला महाराजसाहेब पुन्हा आसरा देतात. व्यक्तिचा द्बेष करण्यापेक्षा त्याच्या प्रवृत्तीचा द्बेष केला पाहिजे, या विचारांचे असलेले उदयनराजें म्हणूनच सहसा कोणालाही अंतर देत नाहीत. पत्थराला पाझर फोडेल, अशी कर्तृत्व गाजवून उदयनराजेंनी आपली हुकमत सिद्ध करून दाखवली आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा, गोरगरीब जनतेसाठी राजेपद विसरून जाणारा, समाजकारणासाठी दिंड्या-पताका हातात घेणारा, रस्त्यावरील मातीत फाटक्या कपड्यांत मुलांमध्ये मिसळून जाणारा हा राजा लोककल्याणकारी आहे. ज्यावेळी कोणतीही अन्यायी घटना घडते त्यावेळी ती दूर करण्यासाठी जनतेच्या मुखातून एकच नाव येते ते म्हणजे फक्त उदयनराजे.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी कायमच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारण, समाजकारणाचा सर्वसामान्य माणूस केद्रबिंदू मानला आहे. गरीबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, ही भूमिका जमणाऱ्या उदयनराजेंनी स्वार्थ न पाहता सर्वसामान्यांचे हितच जोपासण्याचे काम केले. एखाद्या धनिकापेक्षा गोरगरीबाला मदत करणे ही त्यांची विचारधारा आहे. हीच त्यांची विचारधारा महाराष्ट्रासोबत देशभर पोहोचण्याची आवश्यकता आहे. लोककल्याणासाठी झटणाऱ्या या राजाला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद द्यावे. त्यांना मंत्रीपद देऊन तमाम हिंदूचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशजांचा पर्यायाने महाराष्ट्रचा सन्मान करावा. ही जनसामान्यांची इच्छा आई जगदंबेने पूर्णत्वास न्यावी, याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा…

सुनिल काटकर
मा. अर्थ व शिक्षण सभापती
जिल्हा परिषद, सातारा.

Adv