शेतकऱ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पंतप्रधान मोदी

118
Adv

कृषी क्षेत्राच्या विकासावर केंद्र सरकार अधिक लक्ष देऊन काम करीत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सरकार शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी शुक्रवारी ‘कृषी आणि सहकार’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांकडून कल्पना आणि सूचना मिळविण्यासाठी सरकारने 12 पोस्ट-बजेट वेबिनार मालिका आयोजित केली आहे. या मालिकेतील हा दुसरा भाग आहे.मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधान मोदींनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तसेच मागील 8-9 वर्षांच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला दिलेले महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, 2014 मध्ये 25,000 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेला कृषी अर्थसंकल्प आज 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. भारताचे कृषी क्षेत्र स्वातंत्र्यानंतर बराच काळ व्यथित राहिले होते असे त्यांनी नमूद केले.

Adv