Monday, April 20, 2026
spot_img
Home International तरुणांच्या हाताला रोजगार देणारा, बहुजनांचा मसिहा हरपला..

तरुणांच्या हाताला रोजगार देणारा, बहुजनांचा मसिहा हरपला..

304
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

भारतीयत्व जपणारा, व्यापारापेक्षा उदयोगाची मती असणारा, जागतिक उदयोग क्षेत्राला आपल्याजीवन कार्यकर्तुत्वाने नेहमीच एका उंचीवर नेणारे, एक असामान्य व्यक्तीमत्व लाभलेल्या मा. रतनजी टाटायांना आज काळाने आपल्या उदरात सामावून घेतले याचे अतिव दु:ख आहे.

काळ कोणासाठी थांबत नाही हे जरी खरे असले तरी मा. रतनजी टाटा यांच्या जाण्याने समस्त भारतीयांना ज्या वेदना होत आहे त्या व्यक्त करण्यासाठी निश्चितच शब्द नाहीत आपले उत्पन्न समाजासाठी उपयोगात आणणारा असा अवलिया पुन्हा होणार नाही. मा.रतनजीटाटा यांच्या जाण्याने भारतीय उदयोग आणि सामाजिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही नभरुन येणारी आहे. त्यांच्या जाण्याने आमच्यासह समस्त भारतीयांचा आधारवड हरपला. कालाय तस्मै नमः अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने आणिसमस्त जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Adv