कास धरण भरल्याने सातारकरांची पाण्याची चिंता मिटली

736
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा शहराची पाण्याची तहान भागवणारा आणि सातारकरांची लाईफ लाईन असणारा कास तलाव शनिवारी पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून वाहू लागला .कास धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले असून तलावात आता 0.005 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे यामुळे सातारकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे

सातारा पालिकेने कास धरणाची 12.42 मीटर उंची वाढवल्या नंतर काल धरण प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे .सातारा शहराची 2040 पर्यंतची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन कास धरणाची उंची 12.42 मीटर उंची वाढवण्यात आली होती या कामासाठी तब्बल 60 कोटी रुपये खर्च आला सातारा शहरासह पठारावरील 15 गावांची तहान हा तलाव भागवत असतो कास धरणाची भिंत वाढवण्याबरोबर धरणाच्या पिछाडीला पायऱ्यांचे टप्पे करण्यात आले आहेत सततचा पाऊस,मंद धुके,निसर्गरम्य वातावरण यामुळे कास धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढतच आहे

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता कास धरण ओव्हर फ्लो झाले तीनच दिवसापूर्वी कास तलावामध्ये 56 फूट पाणीसाठा झाला होता शनिवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने कास धरण भरून वाहू लागले धरण परिसर हा घळीप्रमाणे असल्यामुळे डोंगरातील ओहोळांचे पाणी खळखळून तलावांमध्ये येत आहे गेल्या पाच दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरण ओसंडून वाहिले आहे

Adv