Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Satara Taluka राजू गिरीगोसावी यांच्या प्रभागातील रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक नाराज रस्ता न...

राजू गिरीगोसावी यांच्या प्रभागातील रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक नाराज रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा

466
Adv

गडकरआळी येथील शिवाजीनगर चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने येते कोणताही लोकप्रतिनिधी फिरत नसल्याने नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत त्यामुळे रखडलेल्या रस्त्याचे श्रेय विद्यमान उपसरपंच राजू गिरिगोसवी घेणार का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत

सातारा शहराच्या हद्दवाडीत येऊन गडकर आळी व इतर भागाला सहा महिने झाले मात्र गेल्या काही महिन्याभरापासून येथील रस्त्याचे काम रखडले आहे असून वारंवार संबंधित लोक प्रतिनिधींना यासंदर्भात येथील नागरिकांनी सूचना केल्या होत्या की रस्त्याचे काम त्वरित करा मात्र आता 15 मे नंतर रस्त्याची कामे बंद होतात त्यामुळे हा रस्ता रखडल्याने नागरिकांची पावसाळ्यात आता प्रचंड दयनीय अवस्था होणार असून या रखडलेल्या कामाचे श्रेय उपसरपंच राजू गिरीगोसावी घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवाजीनगर हा प्रभाग उपसरपंच राजू गिरी गोसावी यांच्या हद्दीत असून घराशेजारील रस्त्याला राजू गोसावींनी बगल दिल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

राजू गिरीगोसावी हे काम करण्यात अव्वल असतात मात्र या कामालाच त्यांनी बगल का दिली हे येथील नागरिकांना पडलेले कोडे आहे लवकरात लवकर येथील रस्ता करावा अशी अपेक्षाही राजू गिरीगोसावी यांच्याकडून येथील नागरिकांनी केली आहे

Adv