विधानपरिषद,राज्यसभेचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर जिल्ह्यातील धैर्य गमावलेल्या दादाला आता विधानसभेचे डोहाळे लागले आहेत लोकसभेत काय दिवे लावले पक्ष वाढीसाठी कोणती रणनीती अवलंबवली याचा लेखाजोखा जिल्ह्यातील मतदारराजा सह मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या फाईल मध्ये सुरक्षित असल्याने धैर्य गमावलेल्या दादाला पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत
गेल्या निवडणुकीत पडद्याच्या मागून पक्षातीलच नेत्यांना विरोध करून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत असलेल्या या दादाला स्वतःचा पक्षच आता योग्य जागा दाखवणार हे त्रिवार सत्य असले तरी हाच धैर्य गमावलेला दादा उद्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याच्या तयारीत असल्याची कुजबुज ही ऐक्यव्यास मिळते
आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून महायुतीतील अजितदादा गट हा चांगलाच जिल्ह्यात अग्रेसर झाला असून कोरेगाव व पाटणचे विद्यमान आमदार हे सक्षम पणे निवडून येणार असल्याची चर्चा रंगत आहे याउलट मात्र केंद्रातील सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपण पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र बसवून पक्षाची ताकद कशी वाढत होईल याचा विसर पडला असल्याचे सध्या तरी दिसून येते याचे मुख्य कारण असे की पक्षाच्या प्रमुखालाच स्वतःची कारकीर्द लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पासूनची चांगलीच आठवते त्यामुळेच यांचे धैर्य गमवले आहे
दिड मतदार संघापुरता पाय रोवून उभा राहिलेला विठ्ठल याचे पक्षात कर्तुत्व शून्य आणि बारा भानगडी जास्त असल्यामुळे विठ्ठल पाय रोवून उभा राहण्याच्या ऐवजी दिड मतदारसंघा पुरते आपले पाय पसरला असल्याचे दिसून येते या यांच्या सावळ्या गोंधळामुळे ना पक्ष वाढतोय ना नेत्यांची आवक असल्या पदाधिकाऱ्यांच्या बारा भानगडींमुळे मुंबईतील मंत्री नेते अडचणीत येतात हे मात्र नक्की
धैर्य गमवलेल्या दादाचे किस्से.. आपणास कळले तर आमच्याशी जरूर संपर्क साधा 9881707770